महिलेला फोन करून जीवेठार मारण्याची धमकी ; जामनेर पोलीसात गुन्हा दाखल

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून महिलेला फोनवरून एकाकडून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा येथे घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी जामनेर पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, उषाबाई सुभाष चव्हाण (वय-४०) या महिला जामनेर तालुक्यातील रामपूर तांडा येथे आपल्या परिवारासह रहायला आहेत. जुन्या भांडणाच्या कारणावरून बोदवड येथील ईरफान सैय्यद याने शनिवारी १२ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजून ५ मिनीटांनी महिलेच्या फोन वरून कॉल करून शिवीगाळ करत माझ्या विरोधात पोलीसात तक्रार दिली तर तुझ्या परिवाराला जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता संशयित आरोपी ईरफान सैय्यद याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ विनोद पाटील करीत आहे.

 

Protected Content