ही महाराष्ट्राशी गद्दारी ; राऊत फडणवीसांवर संतापले

sanjay raut 3

मुंबई (वृत्तसंस्था) केंद्र सरकारच्या ४०,००० कोटी रुपयांच्या निधीचा महाविकास आघाडीच्या सरकारकडून गैरवापर होऊ नये, यासाठी देवेंद्र फडणवीस यांना बहुमत नसतानाही मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली होती, असा खळबळजनक दावा भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी केला होता. त्यांच्या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे.

 

भाजपाचे नेते अनंत कुमार हेगडे यांनी कर्नाटकात एका कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रातील राजकीय नाट्यावर भाष्य केले होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस हे चार दिवसांचे मुख्यमंत्री का झाले? यामागील कारण सांगत खळबळजनक दावा केला की, केंद्र सरकारचा ४०,००० कोटी रुपयांचा विकासनिधीचा शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेसचे सरकार विकासनिधीचा गैरवापर करतील. त्यामुळेच हा निधी परत केंद्राकडे पाठवण्यासाठी फडणवीसांना मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्याचे नाटक केल्याचे सांगितले. त्यांच्या विधानावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ही महाराष्ट्राशी गद्दारी असल्याचे सांगत संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, यावरून आता राजकारण चांगलेच चिघळणार असल्याचे दिसत आहे.

Protected Content