माथेफिरूंनी दोन कार जाळल्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मध्यरात्रीच्या सुमारास माथेफिरुंनी दोन कार जाळल्याची घटना शहरातील रामदास कॉलनीत मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी दुपारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील रामदास कॉलनीत यश जतीन गांधी हे वास्तव्यास असून ते खासगी व्यवसाय करुन उदनिर्वाह करतात. त्यांच्याकडे (एमएच १९ सीयू ७३४८) क्रमांकाची कार आहे. सोमवारी १७ ऑक्टोबर रेाजी रात्रीच्या सुमारास त्यांनी कार घराच्या कंपाऊंटमध्ये लावली होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास माथेफिरुंनी त्यांच्या कारला आग लावून ते घटनास्थळाहून पसार झाले. यश गांधी यांची आई पहाटे ३ वाजेच्या सुमारास पाणी पिण्यासाठी उठल्या असता, त्यांना कार जळतांना दिसून आली. त्यांनी आपल्याला मुलाला उठवित घटनेची माहिती दिली. त्यांनी तात्काळ पाण्याचा मारा करुन आग विझविली. माथेफिरुंनी प्रभात कॉलनीत राहणारे महिपाल बोहरा यांची (एमएच १९ सीयू १९३९) क्रमांकाच्या कार देखील जाळून टाकल्याचे उघडकीस आले. या दोघ घटनांमुळे नगरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी दुपारी यश गांधी यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात माथेफिरुविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content