शेतकऱ्याने उचललं टोकाचं पाऊल…कारण अस्पष्ट !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी आव्हाणे येथील ५३ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. विलास श्रावण सोनवणे (वय-५३) रा. खेडी आव्हाण ता.जि.जळगाव असे मयत प्रौढ व्यक्तीचे नाव आहे.

याबाबत अधिक असे की, विलास सोनवणे हे पत्नी, मुलगा यांच्यासोबत जळगाव तालुक्यातील खेडी आव्हाणे येथे वास्तव्याला होते. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही दिवसांपासून ते कोणत्यातरी नैराश्येत होते. सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास त्यांनी राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण स्पष्ट समोर आलेले नाही.

हा प्रकार घराच्यांच्या लक्षात आल्यानंतर शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी एकच धाव घेतली. त्यांना खाली उतरवून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे करीत आहे. मयताच्या पश्चात पत्नी सुनंदा, मुलगा कृष्णा, विवाहित मुलगी रूपाली आणि चार भाऊ असा परिवार आहे.

 

Protected Content