भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणावर प्राणघातक हल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाच्या पोटावर धारदार वस्तूने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना रविवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाख्ल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  ईश्वर निवृत्ती लोहार (२४, रा. कुसुंबा ता.जि.जळगाव ) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी १५ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कुसुंबा गावातील ओम साई मित्र मंडळाच्या वतीने देवी बसविण्याच्या ठिकाणी ईश्वर लोहार गेला होता. त्याठिकाणी निलेश कोळी आणि कृष्णा भालेराव या दोघांचे भांडण सुरू होते.

ते सोडविण्यासाठी ईश्वर लोहार हा गेला. याचा राग आल्याने  भांडणाऱ्या दोघांपैकी निलेश कोळी याने धारदार वस्तूने पोटावर वार करून ईश्वर लोहार याला जखमी केले.  त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.

याप्रकरणी ईश्वर लोहार याने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी १६ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीच वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात संशयित आरोपी निलेश कोळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिस शेख करीत आहे.

Protected Content