राज्यातील शपथविधी बेकायदेशीर – चंद्रकांत पाटील

मुंबई, वृत्तसेवा | महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर सहा आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, या शपथविधी सोहळ्यावर भाजपचे चंद्रकांत पाटील यांनी प्रश्न उपस्थित करीत हा शपथविधी बेकायदेशी असल्याचा आरोप केला आहे.

शपथविधीची एक पद्धत असते ती डावलून, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी अनेकदा टोकून देखील महाविकास आघाडीने शपथ घेतली ती बेकायदेशीर असल्याचा आरोप भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. याविरोधात राज्यपलांकडे एकाने याचिका दाखल केली असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. नव्या सरकारकडून विहित पद्धतीतनुसार शपथ घेण्यात आली नाही. याविरोधात एकानं राज्यपालांकडे याचिका दाखल केली आहे. तसंच त्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणीही केली आहे. राज्यपालांनी यावर योग्य ती कारवाई न केल्यास सर्वोच्च न्यायालयातही याविरोधात याचिका दाखल होऊ शकते, असं ते म्हणाले. नव्या सरकारकडून नियम धाब्यावर बसवून काम करण्यात येत आहे. राज्यपालांकडून हंगामी अध्यक्षांची निवड झाल्यानंतर पुन्हा मतदानाद्वारे अध्यक्ष निवडेपर्यंत तेच अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांना बदलता येत नाही. परंतु नव्या सराकरनं कालिदास कोळंबकर यांना हटवून त्यांच्या जागी वळसे-पाटील यांची नियुक्ती केली आहे. काल त्यांनी अध्यक्षपदाची शपथही घेतली. त्यातच आज विश्वासदर्शक ठराव आणि उद्या अध्यक्षपदाची निवडणूक असं पहिल्यांदाच घडत असल्याचं पाटील म्हणाले. अध्यक्षपदाची निवडणूक ही गुप्त मतदानानं न करता उघडपणे होत आहे. ही नियमांची पायमल्ली असल्याचं त्यांनी सांगितलं.

Protected Content