नांद्रा येथील विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नांद्रा येथील ३० वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत जळगाव तालुका  पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नांद्रा येथील निलेश सुकराम कोळी हा तरूण आपल्या पत्नी अनिता आणि तीन मुलांसह वास्तव्याला आहे. निलेश हा सेंटींगचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवारी २८ जून रोजी सकाळी निलेश हा कामावर निघून गेला.  त्याची पत्नी व मुले घरीच होती. दुपारी मुले बाहेर खेळत असतांना अनिताने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तिचे पती निलेश कोळी हा घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. त्याने तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता तिला मयत घोषीत केले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिच्या पश्चात पती, मोठी मुलगी स्वाती, मुले तुषार आणि दिपक असा परिवार आहे.

Protected Content