रेल्वेप्रवासात प्रकृती खालाविलेल्या परप्रांतीय तरूणाचा अकस्मात मृत्यू

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मुंबईत सेंट्रींग काम करणारा तरूण हा भावासोबत उत्तरप्रदेश येथे रेल्वेने प्रवास करून गावाकडे जात असतांना त्याची प्रकृती खालविल्याने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. सोमवारी ११ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून रामानंद नगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोरखपुर एक्सप्रेसने सोमवारी ११ सप्टेंबर रोजी पहाटे सहा वाजता राजेंद्र रामकिसुन पासवान (वय-४५) लहान भाऊ दिलीप (वय-२५ दोघे.रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश) असे दोघेही गावाकडे निघाले होते. दुपारी राजेंद्र पासवान यांना पेाटात दुखायला लागल्याने त्यांनी भुसावळ येथे रेल्वे कर्मचाऱ्यांना सांगुन खाली उतरवण्यात आले. ॲम्बुलन्सद्वारे त्यांना जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असतांनाच त्याचा मृत्यू झाला.  नेमका अचानक मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस नाईक अतुल पाटिल करत आहेत.

Protected Content