सावदा/फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जम्मू आणि काश्मीरमधील शांततामय पर्यटनस्थळ असलेल्या पहलगाम येथे झालेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्याचा ‘कौमी एकता फाऊंडेशन’च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. संस्थेने या भ्याड कृत्याचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला असून, पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.
या हल्ल्यात आतापर्यंत २७ निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या क्रूर आणि दहशत निर्माण करणाऱ्या घटनेमुळे संपूर्ण देशात शोक आणि संतापाचे वातावरण आहे. अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
‘कौमी एकता फाऊंडेशन’ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दहशतवादाचा कोणताही धर्म नसतो. भारत नेहमीच शांतता, समता आणि एकतेसाठी ओळखला जातो आणि या मूल्यांचे जतन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. अशा कठीण परिस्थितीत देशातील सर्व नागरिकांनी एकजुटीने उभे राहून सामाजिक सलोखा आणि बंधुभाव टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
फाऊंडेशनने तपास यंत्रणांना तातडीने कार्यवाही करण्याचे आवाहन केले आहे. या दहशतवादी हल्ल्याच्या मुळाशी असलेल्या सर्व आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, जेणेकरून या दुःखद घटनेतील पीडित कुटुंबीयांना न्याय मिळू शकेल, असे संस्थेने म्हटले आहे.
या निषेध सभेत ‘कौमी एकता फाऊंडेशन’चे अध्यक्ष शेख कुर्बान, उपाध्यक्ष शेख इरफान, सय्यद असगर, सेक्रेटरी सय्यद जावेद, कलीम खान, फिरोज खान, आबिद शेख, अमजद खान, शेख शरीफ, हुसेन खान, अस्लम खान, जफर खान, शेख आरिफ, शेख फारुक, शेख साजिद, अमजद खान, जफर अली, अजहर खान, शेख वाहेद, शेख वजीर, तौफिक खान, शाकीर खान, गुड्डू मेंबर, शेख दानिश आणि शेख काशिफ यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.