चुंचाळे-बोराळे गावात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत निवेदन

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील चुंचाळे बोराळे गावात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढत असून गावातील विविध महत्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी भीम आर्मी मार्फत दोन्ही गावांच्या ग्रामपंचायतींना लेखी निवेदनव्दारे करण्यात आली आहे.

या संदर्भात भिम आर्मीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यातील चुंचाळे-बोराळे येथे मागील काही दिवसांपासुन गावच्या परिसरात मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असल्याने परिसरातील रहिवासी व शेतकरी बांधवांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक शेतकरी यांच्या बैल जोडीची चोरी चोरट्यांनी केली. ऐन शेतीचे हंगाम चालू असल्याने बैलजोडी चोरीला गेल्याने शेतीचे काम खोळंबतीलच व शेतकरी बांधवांना अनेक अडचणी निर्माण होवुन मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने सदर शेतकरींच्या कुटुंबा समोर एक संकट ठाकले असत्याचे दिसून येत आहे .

तसेच अश्या घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी व नागरीकांच्या मालमत्तेचे रक्षण करण्याच्या दृष्टीने आपण तात्काळ उपाययोजना राबावाव्या कारण मागील गेल्या एक ते दोन महिन्यांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे परंतु  प्रशासन तपास लावण्यात अपयशी ठरल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तरी सदर घटनेचे गंभीर्य ओळखून नागरिकांच्या मनातील भीती लक्षात घेऊन आपण स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून चोऱ्या रोखण्यासाठी योग्य ते उपाय राबवून सी.सी.टी.व्ही. कॅमेरे दोघे गावात बसवावे, सदर निवेदनाची प्रत आपल्या मार्फत गटविकास अधीकारी यावलव जिल्हाधिकारी कार्यालय जळगांव यांच्या पर्यंत पाठवून मागणीची पूर्तता करावी असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

हे निवेदन १५ ऑगस्ट २०२१  रोजी स्वतंत्र दिनचे औचित्य साधून देण्यात आले आहे,हे निवेदन देते वेळेस भीम आर्मी राज्य सचिव सुपडू संदानशिव,यावल तालुका कोषाध्यक्ष शिवाजी गजरे,शाखा सदस्य राजू वानखेडे,राहुल गजरे,प्रवीण सावळे व मिथुन गजरे आदी उपस्थित होते.

Protected Content