भाजप आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करण्याबाबत निवेदन

जळगाव प्रतिनिधी । विधानसभेतील भाजपा १२ आमदारांचे निलंबन त्वरित रद्द करण्यात यावे, याकरिता राज्यपाल राजभवन मुंबई यांना जिल्हाधिकाऱ्‍यांच्या माध्यमातून निवेदन भाजप व ओबीसी मोर्चातर्फे देण्यात आले आहे.

आज भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा चे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश दामु भोळे (राजू मामा) यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा महानगर चे अध्यक्ष दीपक सुर्यवंशी व मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा महानगराध्यक्ष जयेश भावसार यांच्या उपस्थितीत देण्यात आले.  

जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी, महेश जोशी, महिला मोर्चा प्रदेश उपध्यक्ष सौ. उज्ज्वला बेंडाळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, चिटणीस प्रा.भगतसिंग निकम(सर), महानगर सोशल मीडिया चे अक्षय चौधरी, मंडल अध्यक्ष अजित राणे, ओबीसी आघाडी महानगर सरचिटणीस विजय बारी, ओबीसी आघाडी महिला संपर्क प्रमुख सौ.पुजा ताई चौधरी, अमित शिंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

Protected Content