बैलगाडा शर्यतीसाठी राज्य सरकारची नवीन नियमावली जाहीर

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सुप्रीम कोर्टाने होकार दिल्यानंतर राज्य शासनाने बैलगाडा शर्यती सुरू केल्या असून आता यासाठीची नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे.

मुंबई-सर्वोच्च न्यायालय आणि शासनाच्या परवानगीनुसार सर्वत्र बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. आता बैलगाडी शर्यतीसाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. याच  नियमावलीनुसार बैलगाडा शर्यतीचं आयोजन करावं लागणार आहे. आता नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई आणि अनामत रक्कम जप्त केली जाणार आहे. बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्याआधी पंधरा दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे. शर्यतीच्या पंधरा दिवस अगोदर परवानगी घ्यावी लागणार आहे.

नव्या नियमानुसार बैलांचा छळ करणे, त्यांना उत्तेजक द्रव्य देण्यास मनाई करण्यात आली आहे. एक हजार मीटर अंतराचीही अटही ठेवण्यात आली आहे. अनामत रक्कम, बैलाची शारीरिक तंदुरुस्ती प्रमाणपत्र, शर्यतीसाठी बैलांची छळातून मुक्तता, बैलांना उत्तेजक द्रव्य-मद्याचा वापर न करणे अशा स्वरुपाची नियमावली बैलगाडा र्शयतीसाठी शासनाने लागू केली आहे. या नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

Protected Content