एरंडोलला खरीप पेरण्यांसाठी दुष्काळी अनुदान द्या ; मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे मागणी

604d1a4a 0894 4c67 bbbf 95ca4a1b807e

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोलला खरीप पेरण्यांसाठी दुष्काळी अनुदान देण्यात यावे, या आशयाच्या मागणीचे पत्र तालुका शिवसेना प्रमुख वासुदेव पाटील यांनी सहकार मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांना दिले आहे.

 

तालुका शिवसेना प्रमुख वासुदेव पाटील यांनी मुंबई येथे सहकार मदत व पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख यांची भेट घेऊन त्यांना दुष्काळी अनुदान द्या अशी मागणी केली. निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात ३५ हजार शेतकरी असून त्यांना २३ कोटी दुष्काळी अनुदान मिळणे गरजेचे आहे. याप्रसंगी वासुदेव पाटील यांच्या सोबत युवासेना प्रमुख अतुल महाजन, नगरसेवक कृणाल महाजन, बबलु पाटील, प्रमोद महाजन व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content