संत गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त शेगाव नगरी भक्तीमय !

शेगाव Shegaon – अमोल सराफ | संत शिरोमणी श्री गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रगट दिनानिमित्त आज संत नगरी शेगावचे वातावरण भक्तीमय झाले असून लाखो भाविक येथे दाखल झाले आहेत.

आज श्रींचा १४५ वा प्रगट दिन सोहळा सहभागी होण्यासाठी संत नगरीमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. श्री संत गजानन महाराज (Sant Gajanan Maharaj Shegaon, Buldhana ) संस्थान मध्ये दर्शन बारीत श्री गजानन महाराजांचे नाम स्मरण करीत भाविक शिस्तीत व शांततेत समाधीचे दर्शन घेत आहेत. गावागावाचे भावी पायदळ करत शेगावला पोहोचले असून प्रगट दिनाचा सोहळा पाहण्यासाठी भाविकांना ओढ लागलेली दिसून येते.

धरा पाऊलांनो शेगावाची वाट | देवरूप घेऊन आले गजानन स्वामी झाले ॥ असे भाविक आपल्या नाम स्मरणात म्हणत आहेत. आतापर्यंत शेकडो भजनी दिंड्यांची हजरी संतनगरीत लागली आहे. आज दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम होणार असून दुपारी श्रींच्या रजत मुखवट्याची पालखी नगर परिक्रमा करता निघणार आहे. संपूर्ण मंदिर परिसरात गर्दीचे नियोजन करण्याकरिता स्वयंसेवक शिस्तबद्ध पद्धतीने सेवा देत आहे. भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याकरिता मागील २४ तासापासून मंदिर हे भाविकांच्या दर्शनाकरता खुल आहे.

सध्या जवळपास तीन ते चार तास भाविकांना दर्शनाकरता लागत असून आज दुपारचे मध्यान्ह समयी श्रींच्या प्रगट दिनानिमित्त जयघोष होईल. यावेळी मंदिराच्या दिशेने भाविक फुलांचा वर्षाव करतात ते डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. श्रींच्या मंदिरात पारायण कक्षात शेकडो भावी गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत आहेत. प्रगट दिन उत्सवानिमित्त श्री गजानन महाराज संस्थान शहरातील ठिकठिकाणी महाप्रसाद वितरण करण्यात येते. विविध ठिकाणाहून आलेले भावी महाप्रसादाचा लाभ घेतात. शेगाव शहरात संत गजानन महाराज दर्शन घेण्यासाठी भाविकांची एकच गर्दी झाली आहे .

श्रींच्या दर्शनासाठी मंदिर २४ तास सुरू

श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने प्रगट दिन सोहळा निमित्त भाविकांची गर्दी लक्षात घेऊन श्रींचे समाधी दर्शन २४ तास सुरू ठेवण्यात आले आहे. जय गजानन श्री गजानन मुखी हरिनाम घ्यावे पुढे पाऊल टाकावे वारकरी भक्त मंडळी नाम जप करीत गण गण गणात बोते मंत्राचा नाम जप जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल असा श्री नामाचा टाळ मृदुंगाचा गजर करीत जवळपास एक हजारापेक्षा जास्ती भजनी दिंडी संतनगरी दाखल झाले आहेत. भजनी दिंडी श्रींच्या मंदिर येताच श्रींच्या समाधीचे व कळसाचे दर्शन घेऊन नित्य मार्गाने जात आहेत .एकंदरीत संपूर्ण संत नगरी आज गण गण गणात बोतेच्या नाम स्मरणात नाहून निघाली आहे .

Protected Content