नाही तर पवार. . .पवार ओरडत दगड भिरकावण्याची वेळ तुमच्यावर येईल ! : राऊतांवर खोचक टिका

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सध्या राज्यात सुरू असलेल्या गतीमान घडामोडींच्या पार्श्‍वभूमिवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी खासदार संजय राऊत यांना पत्र लिहून त्यांच्यावर खोचक टीका केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या फेसबुक पेजवरून खासदार संजय राऊत यांच्या नावाने पत्र शेअर केले आहे. यात त्यांनी उध्दव ठाकरे आणि त्यांच्या सहकार्‍यांच्या आज झालेल्या अवस्थेची खिल्ली उडविली आहे.

या पत्रात म्हटले आहे की,

आदरणीय संजय राऊत साहेब, सस्नेह जय महाराष्ट्र !

हे येडुxx मला का पत्र लिहितंय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. विश्वास ठेवा वा ठेवू नका पण तुमच्याबद्दल वाटणार्‍या काळजी पोटीच हे पत्र लिहीत आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपल्या भाषेचा स्तर खालावला आहे. आपली चिडचिड होताना दिसत आहे. आपण बिनबुडाचे आरोप करीत आहात. आपल्या मनाविरुद्ध घटना घडू लागल्या की माणसाचा संयम ढाळू लागतो. त्याची चिडचिड व्हायला लागते. कधी कधी तर नैराश्याचे झटकेही येऊ लागतात. माणूस अटेशन्शन सिकींग होतो. तुम्ही कितीही नाकारलंत तरी ही सगळी लक्षणे तुमच्यात दिसायला लागली आहेत. हे सगळं हाताबाहेर जाण्याआधीच काळजी घ्यायला हवी.

माझी आपल्याला नम्र विनंती आहे की आपण रोजच्या रोज ज्या पत्रकार परिषद घेता त्या ऐवजी दोन दिवसातून एकदा घ्या. मग हळूहळू आठवड्यातून एकदा घ्या, असं करता येईल का ते जरूर पाहा आणि ते जर शक्य नसेल तर पत्रकार परिषेदच्या अगोदर किमान दहा ते पंधरा मिनिटे मेडिटेशन करा. त्यामुळे तुम्हाला थोडं बरं वाटेल.

आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपणच सगळ्यांना आदरणीय पवार साहेबांच्या नादी लावलं आहे आणि त्यामुळेच शिवसेना हातून गेली ही सल (गिल्टी फिलींग ) मनाला लावून घेतली आहे. ती पहिली आपल्या मनातून काढून टाका. तुम्ही काही एकटेच या र्‍हासाला जबाबदार नाहीत. उद्धव साहेब आणि आदित्य साहेब सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत हे लक्षात घ्या. नाहीतर काही दिवसांनी रस्त्यावर पवार पवार.असं ओरडत दगड भिरकवत फिरायची पाळी आपल्यावर येईल.

कधी काळी तुमचा आणि माझा पक्ष भिन्न असला तरी आपल्यात व्यक्तिगत संवाद होता. ममत्व होते. त्याच काळजीपोटी हा पत्रप्रपंच ! पटलं तर घ्यानाही पटलं तर चूxx आहे असं म्हणून विसरून जा !

आपला नम्र,

संदीप देशपांडे

Protected Content