रावेरात उपहारगृह जळून खाक

रावेर प्रतिनिधी । शहरातील जय बजरंग उपहारगृह हे मध्यरात्री लागलेल्या आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.

या बाबत वृत्त असे की रावेर शहरात डॉ बाबा आंबेडकर चौकाला लागून असलेल्या जय बजरंग उपहारगृहाला शॉट सर्केटमुळे रात्री एकच्या सुमारास आग लागून जळुन खाक झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण रावेर शहराची रात्री सुमारास एक तास लाइट बंद होती. या आगीत नेमके कितीचे नुकसान झाले याची प्राथमिक माहिती मिळु शकली नाही. या संदर्भात पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content