राहुल गांधींनी दलित तरूणीशी विवाह करावा : रामदास आठवले

नवी दिल्ली । काँग्रेसचे नेते राहूल गांधी यांनी दलीत तरूणीशी विवाह करावा असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपाइं आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत सरकारच्या हम दो हमारे दो धोरणावरून टीका केली होती. या वक्तव्यावर आता केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय) नेते रामदास आठवले यांनी त्यांना एक सल्ला दिला आहे.

या संदर्भात आठवले म्हणाले की, हम दो, हमारे दो च्या घोषणेचा वापर पूर्वी कुटुंब नियोजनासाठी केला जात होता. जर त्यांना (राहुल गांधींना) या घोषणेचा प्रचार करायचा असेल तर त्यांनी आधी लग्न करायला हवंआणि लग्न करायचं असेल तर त्यांनी दलित मुलीशी करावं आणि महात्मा गांधींचं जातीयवाद हटवण्याचं स्वप्न पूर्ण करावं. त्यांच्या या कृतीतून तरुणांना प्रेरणा मिळेल असे आठवले म्हणाले.

Protected Content