राहुल गांधी यांना नागरिकत्व कायद्याबद्दल काहीही माहीत नाही – खा. सैनी

m.p. nayabsing saini

चंदीगढ, वृत्तसंस्था | हरियाणामधील कुरुक्षेत्र येथील भाजपा खासदार तसेच माजी मंत्री नायबसिंह सैनी यांनी राहुल गांधींवर जबरदस्त टीका केली आहे. नायब सिंह सैनी यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख मूर्ख असा केला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना सुधारित नागरिकत्व कायद्याबद्दल काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

या कायद्यामुळे कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व हिसकावले जाणार नाही ही गोष्ट राहुल गांधींना माहिती नसल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. भाजपाने सुरुवातीपासून काँग्रेस नागरिकत्व कायद्यासंबंधी लोकांमध्ये गैरसमज परसवत असल्याचा आरोप केला आहे.

काय म्हणाले सैनी ?
“जर कोणी महामूर्ख असेल तर ते राहुल गांधी आहेत. कारण त्यांना नागरिकत्व कायदा काय आहे, कशासाठी आहे हेच माहित नाही. आपण कोणत्या गोष्टीचा विरोध करत आहोत, याची राहुल गांधींना कल्पनाच नाही,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.

विरोधकांकडे मुद्दाच नाही
भाजपा नेते नायब सैनी यांनी काँग्रेसवर टीका करताना सरकारला घेरण्यासाठी त्यांच्याकडे अन्य कोणता मुद्दा नसल्याचे म्हटले आहे. यामुळेच काँग्रेस कायद्यासंबंधी लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहे, असा आरोप त्यांनी केला.

Protected Content