पाल येथे विकसित भारत संकल्प यात्रेतून जनजागृती

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॉरंटी मुळे केंद्र सरकारच्या सर्व योजना सर्वसाधारण जनते पर्यंत पोहचत आहे. भाजपा सरकारच्या नऊ वर्षाच्या कार्यकाळ गरीब जनतेच्या घरा पर्यंत मोदी सरकारच्या योजना पोहचल्याचे प्रतिपादन रावेर लोकसभा निवडणुक संयोजक नंदकिशोर महाजन यांनी केली. पाल ता.रावेर जि.जळगांव येथे विकसित भारत संकल्प यात्रे च्या माध्यमातून विश्वनेते भारताचे यशस्वी पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी लाईव्ह संवाद नागरिकांशी साधला.

त्या वेळेस जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष अमोलदादा जावळे,प्रदेश सदस्य सुरेशभाऊ धनके, लोकसभा निवडणुक संयोजक नंदकिशोर महाजन, जिल्हा उपाध्यक्ष पद्माकरभाऊ महाजन, जिल्हा महिला अध्यक्षा रंजनाताई पाटील,पंचायत आणि ग्राम विकास विभागाचे जिल्हा अध्यक्ष सुनील पाटील, विकसित भारत संकल्प यात्रे चे जळगांव जिल्हा पूर्व (रावेर) चे जिल्हा संयोजक प्रा. उमाकांत महाजन, जिल्हा सरचिटणीस हरलालभाऊ कोळी, जिल्हा चिटणीस श्रीकांतभाऊ महाजन व गोमतीताई बारेला,तालुकाध्यक्ष महेशभाऊ चौधरी, ग्राम विकास विभागाचे रावेर तालुका संयोजक संजय महाजन, महेंद्र पाटील, युवा सरचिटणीस शुभमभाऊ पाटील,धनसींग पवार,नंदकिशोर चव्हाण वासु नरवाडे आणि गावाचे सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

Protected Content