धरणगाव ‘नाभिक समाज’तर्फे रावसाहेब दानवे यांचा निषेध.

धरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | समजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांनी समस्त नाभिक समाजाची माफी मागावी. ह्या मागणीचे ‘जळगांव जिल्हा नाभिक महामंडळ’ अंतर्गत धरणगाव तालुका व शहर नाभिक बांधवांनी धरणगाव तहसीलदार कार्यालयात श्री.साळी यांना निवेदन दिले.

या निवेदनात, “केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आघाडी सरकारला न्हावी समाजाची उपमा देऊन, नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या आहेत त्याबद्दल त्यांनी समस्त नाभिक समाजाची माफी मागावी” अशी मागणी करण्यात आली आहे.

याप्रसंगी राजेंद्र आण्णा फुलपगार, महेश निकम, सतीश बोरसे, प्रशांत फुलपगार, कमलेश बोरसे, ज्ञानेश्वर झुंजारराव, संदीप निकम, अर्जुन परदेशी, सचिन ठाकरे, बापूजी फुलपगार, राहुल निकम, मनोहर निकम व समस्त नाभिक बांधव धरणगाव शहर व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.

 

Protected Content