जळगावात आक्रोश : तरूणांनी स्वयंस्फुर्त मोर्चा काढून बंद केली दुकाने (व्हिडीओ)

जळगाव । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याविरूध्द संतापाची लाट उसळली असून आज शहरातील तरूणांनी स्वयंस्फुर्तीने मोर्चा काढून बाजारपेठ बंद केली आहे.

जळगाव शहरात कालच पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. तर आज सकाळी सुमारे दहा वाजेपासून तरूणांनी स्वयंस्फुर्तीने मोर्चा काढून व्यापार्‍यांना दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. व्यापार्‍यांनीही याला सकारात्मक प्रतिसाद देऊन दुकाने बंद केली. गोलाणी मार्केट, नवीपेठ, दाणा बाजार, फुले मार्केट, जयकिसन वाडी, विसनजी नगर आदी प्रमुख व्यावसायिक भागांमध्ये युवकांनी मोर्चा काढून दुकाने बंद करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी तरूणांनी जोरदार घोषणाबाजी करून पाकिस्तानचा निषेध केला. तर युवकांनी रिक्षा चालकांनाही व्यवसाय बंद ठेवण्याचे आवाहन केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, पुलवामा येथील घटनेबाबत जळगावसह परिसरात तीव्र संतापाची लाट उसळल्याचे दिसून येत आहे.

पहा:– जळगावातील बंदबाबतचा हा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content