मारुळ येथे अज्ञात माथेफिरूने रस्त्यावर खोदले खड्डे; नागरिकांची ग्रामपंचायतीत तक्रार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या मारुळ ते हंबर्डी या रस्त्याची मागील काही दिवसांपासुन खूपच दयनीय अवस्था होती त्यामुळे वाहनधारक शालेय विद्यार्थी महिला वयोवृद्ध शेतकरी मोठ्या प्रमाणावर त्रस्त होते मारुळ ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच असद जावेद सैय्यद व त्यांच्या सहकार्यांनी सदरच्या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण व्हावे याविषयी यावल रावेर मतदार संघाचे आ.शिरीष चौधरी यांच्याकडे सतत पाठपुरावा केल्याने सदरच्या रस्त्याचे नवीन डांबरीकरण करण्यात आले होते. या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण झाल्यामुळे शालेय विद्यार्थी,शेतकरी, महिला, वयोवृद्ध यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होऊन होणारा त्रास कमी झाला होता. दरम्यान एक-दोन दिवसाआधी रात्रीच्या वेळेस अंधाराचा गैरफायदा घेऊन कुणीतरी अज्ञात माथेफिरूने नवीन डाबंरी रस्त्यावरती जाणून बुजून नवीन अल्पसंख्यांक समाज बांधवांच्या कब्रस्तानाजवळ रस्त्यात दोन ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदल्यामुळे रहदारीस व सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना तसेच बुद्धनगरी, अरबी मदरसा येथील नागरिक, शालेय विद्यार्थी, अंगणवाडीचे लहान चिमुकले बालके, महिला, वयोवृद्धांना, शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात २ मे २०२४ रोजी मारूळ ग्रामपंचायतचे ग्रामपंचायत सदस्य हे मोटर सायकलीने हंबर्डीवरून मारुळ येथे येत असताना रस्त्यात खोदलेल्या खड्ड्यामध्ये त्यांच्या मोटरसायकलचा अपघात होऊन त्यांच्या उजव्या पायाला मोठी दुखापत झाले असून ते सुदैवा थोडक्यात बचावले तर दुसऱ्या दिवशी एका महिलेचा पाय खड्ड्यात पडल्यामुळे त्यांच्याही पायास दुखापत झालेले आहे.

मारुळ ते हंबर्डी या रस्त्याने नियमित रात्रंदिवस मोठ्या प्रमाणावर रहदारी सुरू असते त्यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही बुद्धनगरी येथील रहिवासी महिला, शालेय विद्यार्थी, शेतकरी, वयोवृद्ध, कामानिमित्ताने याच रस्त्याने ये जा करत असतात त्यांना ही या माथेफिरूने केलेल्या घाणेरड्या कृत्याची मोठी किंमत भविष्यात सर्वसामान्य माणसांना मोजावी लागेल अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये त्या अज्ञात माथेफिरू विषयी प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे आज सकाळी संतप्त नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालय गाठून सरपंच असद सैय्यद व कार्यकारिणी ग्रामविकास अधिकारी आर टी बाविस्कर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जावेद अली सैय्यद यांची भेट घेऊन आपल्याला होणारा त्रासाबद्दल कैफियत मांडून भविष्यात अपघात होऊ नये व आमचा दैनंदिन त्रास दूर व्हावा अशी एकमुखी मागणी नागरिकांकडून करण्यात आल सदरचा डांबरी रस्ता हा शासकीय मालमत्ता असून त्या शासकीय मालमत्तेची एका अज्ञात माथेफिरू इसमाने नासधुस करून शासकीय मालमत्तेचे नुकसान करून शासनाच्या निधी वाया घालवुन तसेच सर्वसामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या अज्ञात माथेफिरू इसमाविरुद्ध सार्वजनिक बांधकाम यावल विभाग, पोलीस प्रशासन, तहसीलदार, गटविकास अधिकारी, सरपंच ग्रामपंचायत कार्यालय मारुळ हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे तसेच अज्ञात माथेफिरू इसमा विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Protected Content