मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट – बाळासाहेब थोरात

 

मुंबई – महाविकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत, असा आरोप महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे.

बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राच्या बदनामीचा नियोजनबद्ध कट रचण्यात आला आहे. हा कट कुणी रचला आहे हे महाराष्ट्रातील जनतेला माहित आहे. महाराष्ट्र विकास आघाडी सरकार विरोधात कारस्थाने करणारे आता महाराष्ट्र आणि मराठी माणसांविरोधात कट कारस्थाने करत आहेत, असा आरोप करत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

ज्या मुंबईने आणि महाराष्ट्राने कंगणा राणावतला काम, नाव, पैसा आणि प्रसिद्धी मिळवून दिली त्या मुंबई आणि महाराष्ट्राची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे हा कृतघ्नपणा आहे. तिने महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान केल्याचा त्यांनी आरोप मंत्री थोरात यांनी आज ट्विटरवरून केला आहे.

Protected Content