पीपल्स सोशल फाऊंडेशनतर्फे वर्धापन दिन रद्द करून पूरग्रस्तांना मदत

purgrast madat

चाळीसगाव, प्रतिनिधी | येथील पीपल्स सोशल फाऊंडेशनला येत्या २२ ऑगस्ट रोजी पाच वर्ष पुर्ण होत आहेत. यावेळी मात्र संस्थेने वर्धापनदिन साजरा न करण्याचा निर्णय घेऊन त्याचा खर्च होणारी रक्कम कोल्हापुर, सांगली, सातारा येथे आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या लोकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

माजी आमदार राजीव देशमुख यांनी तालुक्यातील सर्व संघटना, पक्ष, यांना एकत्र येवून पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन केले होते. त्यात फाउंडेशनच्या वतीने 2300 बिस्कीट पुडे देण्यात आले आहेत. ही मदत देताना राजीव देशमुख यांच्यासह प्रमोद पाटील, पीपल्स फाऊंडेशन अध्यक्ष आकाश पोळ, उपाध्यक्ष सागर पाटील, शुभम महाजन, हर्षल माळी, राकेश गुरव, दीपक मोरे, नितीन घाडगे, अरविंद खेडकर, प्रणाल पवार, राहुल बोरसे आदी उपस्थित होते.

Protected Content