पाचोरा, प्रतिनिधी | येथील रहिवाशी फकिरचंद पाटील यांची किसान भारतीच्या उपसंपादकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कृषिश्री फकीरचंद पाटील हे कृषि पदवीधर संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष असून किसानभारती हे या राज्य कृषि व उद्योजकता विषयावर वाहिलेले संघटनेचे मुख पत्र आहे. कृषि पदवीधर संघटना ही गेले १० वर्ष कृषि पदवीधर, शेतकरी यांच्यासाठी काम करणारी संघटना आहे. फकिरचंद पाटील यांचा पत्रकारितेत दांडगा अनुभव असल्यामुळे किसानभारती मासिकाचे मुख्य संपादक कृषिभूषण महेश कडूस पाटील व या मासिका चे कार्यकारी संपादक कृषिश्री प्रतीक बोंगाडे यांच्या सकारात्मक चर्चे नंतर कृषिश्री फकिरचंद पाटील यांना जळगाव जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील कृषि व संलग्न पदवीधर विद्यार्थी उद्योजक शेतकरी यांना किसानभारती ला जोडले जाण्याचे आवाहन फकिरचंद पाटील यांनी केले आहे. तसेच त्यांच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरावरुन अभिनंदन केले जात आहे.