अस्मिताताई फाऊंडेशनच्या संपर्क कार्यालयास प्रारंभ

पाचोरा प्रतिनिधी । अस्मिताताई फाऊंडेशनचे जनसंपर्क कार्यालय नांद्रा येथे सुरू करण्यात आले असून याच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यात येणार आहे.

कुरंगी-बांबरूड जिल्हा परिषद गटातील सर्वसामान्य जनतेची दैनंदिन कामे व अडचणी कुठे तरी सोडविल्या पाहिजे हे हेतु डोळ्यासमोर ठेऊन त्यांचे कागदोपत्री कामांचे मार्गदर्शन करण्यासाठी जनसंपर्क कार्यालय तयार करून या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातुन अनेक नागरीकांचे दैनंदिन प्रश्‍न मार्गी लावायचा प्रयत्न अस्मिता ताई फाऊंडेशन करणार आहे. याच बरोबर विविध सामाजिक उपक्रम व कार्यक्रम राबविण्याचा संकल्प अस्मिता फाऊंडेशन चे अध्यक्ष सौ.अस्मिता पाटील यांनी केला आहे. आज कोरोनाचे नियम व अटी पाळत प्रमुख ५० जणांच्या उपस्थित हा उदघाटन सोहळा पार पडला.

या सोहळ्याला परीसरातील अनेक प्रमुख लोकांनी उपस्थिती दिली.यामध्ये नांद्रा येथील विनोद तावडे ,पंकज सर, पत्रकार यशवंत पवार, सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील,योगेश पाटील,भरत पाटील,बंडुभाऊ पाटील,डॉ.सचिन पाटील, हिरालाल पाटील,भुषण पाटील,एस आर पाटील सह अनेक प्रमुख महिलांनी उपस्थिती दिली.

अस्मिताताई फाऊंडेशनचे कार्यालय दररोज सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ६ वेळेत सुरू असणार आहे.आणि येणारे सर्व शासकीय योजनांची माहिती व कामे आणि पाठपुरावा मार्गदर्शन मदतनिसांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

Protected Content