लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी संकल्प यात्रेचे आयोजन : खा. उन्मेशदादा पाटील

चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | देश आणि देशवासी विकसित होणार असल्याचा मनोदय घेऊन संकल्प यात्रा आपल्या दारापर्यंत येणार असल्याचा आनंद असल्याची भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

भारत सरकार फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहचविण्याच्या उद्देशाने केंद्र शासन मार्फत राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने दि.15 नोव्हेंबर 2023 ते दि.26 जानेवारी 2024 या कालावधीत “विकसित भारत संकल्प यात्रा” ही मोहिम राबविण्यात येणार असून मोहिमेच्या जळगांव जिल्ह्यात फिरणाऱ्या रथापैकी आज ओझर ता. चाळीसगाव येथील रथाचा शुभारंभ करण्यात आला आहे. विविध योजनांच्या माध्यमातून एक तरी लाभ आपणास मिळावा यासाठी केंद्र सरकारची धडपड सुरू आहे.हा लाभातून आपण आत्मनिर्भर होणार असून यातून देश आणि देशवासी विकसित होणार असल्याचा मनोदय घेऊन ही संकल्प यात्रा आपल्या दारापर्यंत येणार असल्याचा आनंद असल्याची भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी व्यक्त केली आहे.

आज सकाळी दहा वाजता खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या हस्ते तर लोकनियुक्त सरपंच सौ प्रणाली पवार,गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, चाळीसगांव भाजपा सोशल मीडिया प्रमूख बाजीराव आहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून जनजागृतीसाठी हा रथ रवाना करण्यात आला.

खासदार पाटील पुढे म्हणाले की माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वात भारत सरकार च्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचावेत या दृष्टीने केंद्र शासनाने राज्य/केंद्र शासित प्रदेशांच्या सहकार्याने माहे एप्रिल-मे 2018 या कालावधीत ग्रामस्वराज्य अभियान तसेच माहे जुन-ऑगस्ट 2018 या कालावधीत विस्तारीत ग्राम स्वराज अभियान राबविले असून, अद्यापही ज्या योजनांचे लाभ लक्ष्यित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले नाहीत, अशा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उददेशाने “विकसित भारत संकल्प यात्रा” ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आली असून आज ओझर ता.चाळीसगाव येथून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला असून ही एल ई डी माहितीपट असलेला रथ तालुक्यात फिरणार आहे.

याप्रसंगी लोकनियुक्त सरपंच सौ प्रणाली पवार यांनी श्रीफळ वाढवून रथाचे पूजन केले. गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी प्रास्ताविक तर आदर्श शिक्षक निकम सर यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

Protected Content