महेलखेडी तेथे एस.टी. बसखाली चिरडून बालिकेचा मृत्यू

80efb05d 1776 4761 9a68 d007be25d577

यावल (प्रतिनिधी) तालुक्यातील महेलखेडी गावात एस.टी. बसखाली येवुन चार वर्षीय चिमुकलीचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असुन पोलीस घटनास्थळी पंचनामा करीत आहेत.

 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, आज (दि.२४) सायंकाळी ५.०० वाजेच्या सुमारास यावलहुन हरीपुरा गावाकडे जाणाऱ्या एस.टी. बस (क्र.एम.एच.२०; डी एल.०९५३) महेलखेडी बस थांब्याजवळ आली असता बस थांब्याजवळ राहात असलेले किरण संतोष निकाळजे यांची ४ वर्ष वयाची भाची रागिणी समाधान मरसाळे ही आपल्या मामाच्या अंगणात खेळत असतांना बसखाली चेंगरून जागीच मरण पावली. ही घटना घडल्यावर या एस टी वरील चालक ए.पी. पाटील व वाहक पी.जी. पाटील यांनी घाबरून घटनास्थाळावरून पळ काढला असल्याचे ग्रामस्थानी सांगीतले. गावातील युवकानी अपघातस्थळी धाव घेतली पण या अपघातात ४ वर्षीय रागीनी चा घटना स्थळीच चिरडली गेल्याने जागीच तिचा मृत्यु झाला,रागिणी समाधान मरसाळे ही मुळ खेडी कढोली ता. एरंडोल, जि. जळगाव येथे राहणारी असुन, ती आईसोबत १५ दिवसांपूर्वी येथे आली होती, तिची आई मुक्ताईनगर येथे शस्त्रक्रीयेसाठी गेली असुन तिथेच उपचार घेत आहे.

याबाबत यावल कृषी उत्पन्न बाजार समीतीचे उपसभापती राकेश वसंत फेगडे व कोरपावलीचे माजी सरपंच जलील सत्तार पटेल यांनी घटनेची माहिती यावल पोलीसांना कळविल्याने तात्काळ सहाय्यक पोलीस निरिक्षक सुजित ठाकरे यांच्यासह पो.कॉ. नेताजी वंजारी, सिकंदर तडवी आदी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करीत आहेत. यावलचे एस.टी.आगार व्यवस्थापक आसाराम भालेराव यांच्यासह आगाराचे गोविंद जंजाळ व जयंत कुरंभट्टी हे अपघातस्थळी पहोचले असल्याचे आगाराच्या सूत्रांनी सांगीतले आहे.

Add Comment

Protected Content