रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बऱ्हाणपुर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर वडगाव (ता. रावेर) नजीक सुकी नदी पुलावर मोटरसायकल व ब्रिझा कार यांच्यात भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत वडगाव येथील जावेद सत्तार तडवी (वय ३९) यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे दोन साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची बातमी समजताच वडगाव गावावर शोककळा पसरली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वडगाव येथील जावेद तडवी, वसीम करीम (वय ३०) व बबलू अशरफ (वय २७) हे तिघे सुझुकी मोटरसायकल (MH ४८ BX ७९२६) वरून सावदा येथे खरेदीसाठी गेले होते. खरेदी करून परत येत असताना सुकी नदी पुलाजवळ रावेरहून सावदाकडे जाणाऱ्या ब्रिझा कार (MH १९ CY १००७) ने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली.या अपघातात जावेद तडवी यांचा जागीच मृत्यू झाला असून वसीम करीम व बबलू अशरफ हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रावेर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव हलविण्यात आले आहे.