महाविकास आघाडीच्या दोन वर्षपुर्तीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फटाके फोडून जल्लोष

जळगाव प्रतिनिधी । महाविकास आघाडी शासनाला दोन वर्ष पुर्ण झाले आहे. या निमित्ताने आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने दोन वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. आज रविवारी २८ नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडी सरकारला यशस्वीपणे दोन वर्ष पुर्ण झाले आहे. याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयात दोन वर्षपुर्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान दुपारी ४ वाजता राष्ट्रवादी कार्यालयासमोर जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र भैय्या पाटील यांच्या उपस्थितीत नागरीकांना पिठी साखर वाटप करून व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार मनिष जैन, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश चिटणीस एजाज मलीक, वाय.एस. महाजन, दिलीप माहेश्वरी, कल्पिता पाटील, आरोही नेवे, संजय चौहान, रमेश बेहरे, सुशील शिंदे, जितू बागरे, मधुकर पाटील, सलीम इनामदार, मझर पठाण, रिजवान खाटिक, रहीम तडवी, अकील पटेल, राजू मोरे, राजू बाविस्कर, विशाल देशमुख, अमोल कोले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content