मोदींना पर्याय नाही; राहूल यांनी त्रियोग तर दिग्वीजयांनी मौन योग करावा ! : रामदेव

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील १०-२० वर्षे पर्याय नसल्याचे सांगत राहूल गांधी यांनी त्रियोग तर दिग्वीजय सिंह या मौनयोग करावा असा खोचक सल्ला आज योगगुरू बाबा रामदेव यांनी केला आहे.

न्यूज-१८ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रामदेव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. यात त्यांना प्रश्‍न विचारण्यात आला होता की देशात मोदी फॅक्टर आहे का? त्यावेळी त्यांनी उत्तर दिलं की, कोट्यवधी लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर विश्‍वास आहे. त्यांच्यात आणि इतर राजकारण्यांमध्ये जमीन आस्मानाचा फरक आहे. सगळ्या देशाला हे ठाऊक आहे की मोदींना स्वतःसाठी काहीही नको आहे जे काही करायचं आहे ते देशासाठी करायचं आहे. प्रभू कृपेने त्यांना हे सगळं काही मिळालं आहे. असंही बाबा रामदेव म्हणाले. इतकंच नाही तर भारताच्या राजकारणात सध्या पुढच्या १० ते २० वर्षांसाठी तरी मला मोदींना कोणताही पर्याय आहे असं दिसत नाही. तर, राहुल गांधी यांनी त्रियोग करावा तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा असा खोचक सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला आहे.

तुम्ही मोदी भक्त आहात असा आरोप तुमच्यावर होतो असं जेव्हा बाबा रामदेव यांना विचारण्यात आलं तेव्हा ते म्हणाले की मी मोदीभक्त नाही तर राष्ट्रभक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रभक्त आहेत त्यामुळे मी त्यांचा सहयोगी असल्याचे प्रतिपादन बाबा रामदेव यांनी केले आहे.

Protected Content