शेतकऱ्यांच्या पिकेला भाव मिळावा यावरून राष्ट्रवादी आक्रमक

भुसावळ- लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळावा यासाठी शरद पवार गट आक्रमक पवित्रा घेत  तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. व ठेचा भाकरी खाऊन राज्य सरकारचा निषेध केला.

शेतकऱ्यांच्या कापसाला व कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने भुसावळ मध्ये शरद पवार गट आक्रमक झाल्याचे आज बघायला मिळाले. यावेळी शेतकऱ्यांसमवेत राष्ट्रवादीने तहसील कार्यालयासमोर मोर्चा काढला. व कापूस, कांदे फेकून देत जोरदार घोषणाबाजी केली.

तसेच तहसील कार्यालयासमोर ठेचा भाकरी खाऊन राज्य सरकारचा निषेध केला. तहसील कार्यालयात देखील कापूस व कांदा फेकत सरकारचा निषेध नोंदविण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील , पक्षाचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Protected Content