मुंबई महापालिकेने जेसीबीद्वारे केल्या ४३०० हातगाड्या नष्ट

Mumbai University

मुंबई वृत्तसंस्था । मुंबई महानगरपालिकेने अनधिकृत फेरीवाल्यांच्या तब्बल ४ हजार ३०० चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करत त्या जेसीबी मशीनद्वारे तोडून टाकण्यात आल्या. मुंबईतील एकूण २४ प्रभागांमध्ये कारवाई करत या हातगाड्या ताब्यात घेण्यात आला होत्या. पूर्वी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत जप्त करण्यात आलेल्या हातगाड्या दंड भरल्यानंतर परत देण्यात आल्या होत्या. आता मात्र त्या नष्ट करण्यात येत आहेत.

मुंबई शहरासह उपनगरांमध्ये छोटे व्यवसाय करण्यासाठी चार चाकी हातगाड्यांचा वापर केला जातो. या हातगाड्यांमुळे नेहमीत वाहतुकीला अडथळे निर्माण होत असतात. शिवाय नागरिकांची चालताना गैरसोय होत असते. तर, कधी अपघातही होतात. हेच लक्षात घेत महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने आपली कारवाई अधिक कठोर केली. या कारवाईअंतर्गत ३० नोव्हेंबरपर्यंत मागील दोन आठवड्यांपर्यत सुमारे ४ हजार ३०० हातगाड्या महापालिकेने कारवाईअंतर्गत जप्त केल्या होत्या.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने १६ नोव्हेबरपासून अनधिकृत हातगाड्या जप्त करायला सुरुवात केली. या कारवाईत सर्वात जास्त ३१९ हातगाड्या अंधेरीमधून जप्त करण्यात आल्या. त्यानंतर कुर्ल्यामधून २५२, तर चेंबूरमधून २१२ हाजगाड्या जप्त करण्यात आल्या. मुंबईतील रेल्वे स्टेशन आणि बाजारांमधील अतिशय गर्दीच्या ठाकाणी फिरत असलेल्या अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करत सर्वसामान्य नागरिकांसाठी रस्ते मोकळे करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगर पालिकेने ही कारवाई सुरू केली आहे. १६ नोव्हेबरपासून ही कारवाई सुरू करण्यात आली. त्या कारवाईअंतर्गत धडक कारवाई करत अवघ्या दोन आठवड्यांमध्ये महापालिकेने तब्बल ४ हजार ३०० अनधिकृत हातगाड्या जप्त केल्या होत्या.

Protected Content