ईव्हीएम अन मॉब लिंचिंगविरोधात लोकशाही बचाव संघर्ष समितीतर्फे आंदोलन

78979c55 ed2b 4393 bc1e d30acc2699d6

जळगाव, प्रतिनिधी | सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन (ईव्हीएम) वापरून मोठ्या प्रमाणावर फेरफार होत आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा आणि त्यांच्या आघाडीने ईव्हीएममध्ये घोटाळे करून पाशवी बहुमत प्राप्त केले आहे. यामुळे मतदारांचे मताधिकाराचे मुल्य ‘झिरो’ झाले असून प्रौढ मताचा अधिकार धोक्यात आल्याने संसदीय लोकशाही संकटात सापडली आहे. यासाठी ईव्हीमद्वारा होणारी निवडणूक प्रक्रिया बंद करून आगामी विधानसभा निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात तसेच मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, या आशयाची मागणी घेवून जळगाव जिल्हा लोकशाही बचाव संघर्ष समितीच्या वतीने आज मंगळवार(१६जुलै) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे प्रदर्शन आंदोलन करण्यात आले.

यावेळी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. “ईव्हीएम हटाव,लोकशाही बचाव” “मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी,” ” रामानंद नगर येथील निलेश सपकाळे या युवकास आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी” या मागण्यांचे निवेदन अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर याना सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इलेक्ट्रॉनिक्स वोटिंग मशीनमध्ये फेरफार होत असल्याने मतदारांचा मतदान प्रक्रियेवरचा विश्वास उडाला आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेल्या जर्मनी, ऑस्टेलिया, अमेरिका तसेच इतर विकसित राष्ट्रांनी ईव्हीएम मशिन नाकारले असतांना भारतात ईव्हीएमद्वारा मतदान प्रक्रिया राबवण्याचा घाट हा लोकशाही संपुष्टात आणणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मोजणी करतांना झालेल्या मतदानापेक्षा प्रत्येक ठिकाणी जास्त मतदान आढळून आल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. ईव्हीएम वापरून घोटाळ्याची ही विसंगत कृती बंद झाली पाहिजे.

मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, शहरातील रामानंदनगर येथील रहिवाशी निलेश सपकाळे या युवकास आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्यांना तातडीने अटक करण्यात यावी. मागण्यांचा गांभीर्याने विचार न केल्यास मतदार लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून जनआंदोलन करतील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

धरणे आंदोलनात लोकशाही बचाव संघर्ष समितीचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे, गफ्फार मलिक, भारत ससाणे, शिवराम पाटील, संजय मुरलीधर पवार, सचिन धांडे, खुशाल चव्हाण, हरिश्चंद्र सोनवणे, ईश्वर मोरे, विवेक ठाकरे, बाबुराव वाघ, पियुष नरेंद्र पाटील, अशपाक पिंजारी, प्रा.प्रितीलाल पवार, दिलीप सपकाळे, फहिम पटेल, संजय सपकाळे, गुरुनाथ सैदाणे, प्रा.डॉ.आशिष जाधव, गमीर शेख, दीपक बाविस्कर, चंदन बिर्‍हाडे, भारत सोनवणे, समाधान सोनवणे, नाना मगरे, माजी नगरसेवक राजू मोरे, सचिन अडकमोल, दिलीप त्र्यंबक सपकाळे, जे.डी.भालेराव, आनंदा तायडे, गौतम सपकाळे, चंद्रकांत नन्नवरे, उत्तम भालेराव, विशाल अहिरे, विश्वास बिर्‍हाडे, पितांबर अहिरे, रविंद्र भालेराव, विजय करंदीकर, यशवंत घोडेस्वार, संजय बागूल, रफीक पिंजारी, डिगंबर बडगुजर,डॉ.शरीफ बागवान, अंजुम रजवी, उत्तम भालेराव यांच्यासह लोकसंग्राम मोर्चा, जनसंग्राम मोर्चा, बारा बलुतेदार महासंघ, शेतकरी संघटना, जळगाव जागृत मंच आदी संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लक्षणीय सहभाग होता. यावेळी मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे, गफ्फार मलिक, शिवराम पाटील, भारत ससाणे, ईश्वर मोरे, प्रा.प्रितीलाल पवार, फहीम पटेल, गुरुनाथ सैंदाणे आदींनी आपले विचार व्यक्त केले.

Protected Content