जळगावात विवाहितेचा विनयभंग; तरूणावर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । राज्यात बहुचर्चीत असलेल्या आशादीप प्रकरणात महिलेले पहिजे तसा जबाब का दिला नाही याकारणावरून महिलेले शिवीगाळ करून मनास लज्जा उत्पन्ना होईल असे कृत्य करून विनयभंग केला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शहरातील एका भागात राहणारी महिला आपल्या कुटुंबियांसह राहते. गेल्या महिन्यात १ मार्च रोजी शहरातील आशादीप वसतीगृह येथे मुलींना नाचविण्याचा प्रकरण समोर आले होते. हे प्रकरण राज्यात गाजले होते. याप्रकरणात तक्रारदार साहिल आयुब पठाण (वय-२२) रा. शिव मंदीराजवळ, समता नगर  याने  सदरील महिलेला जिल्हाधिकारी यांच्यासमोर पोलीस हे बायांना नाचवितात असा जबाब मी सांगल्याप्रमाणे का दिला नाही या कारणावरून १ एप्रिल रोजी विवाहितेच्या घरात घुसून शिवीगाळ केली. व मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि शांताराम पाटील करीत आहे.

Protected Content