देशाचे विभाजन करण्याचा मोदींचा डाव : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | देशाचे विभाजन करण्याचा मोदी सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

आज पत्रकारांशी बोलतांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आम्ही विरोधीपक्षात आहोत, मग आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक का करायचे. असे म्हणतानाच देशाचे विभाजन करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे, त्यासाठी देशात जातीयता, धर्मांधतेचे विष पेरतंय असा गंभीर आरोप चव्हाणांनी केला आहे.

या सर्वांचे मोदी सरकारने उत्तर द्यावे असेही चव्हाणांनी म्हटले आहे. तर शिंदे-फडणवीस यांच्या महाराष्ट्र दौर्‍यावर देखील त्यांनी टीका केला आहे. मुख्यमंत्री- उपमुख्यमंत्री सोबत महाराष्ट्रात फिरणार आहे ही चांगली गोष्ट आहे. त्यांनी महाराष्ट्रात फिरून जनतेची मदत करायला हवी, जनेतची दु:ख समजून घेत, राज्यात ओला दुष्काळ आहे, मदत केली पाहिजे, असा सल्ला त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना दिला आहे.

Protected Content