…आता बच्चू कडू यांची देखील मुख्यमंत्री बनण्याची इच्छा !

अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांना अद्यापही मंत्रीपद मिळालेले नसतांना त्यांनी थेट आता मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीतील एका कार्यक्रमात मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली. याबाबत टिव्ही नाईन या मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. यानुसार, कडू म्हणाले की, ’प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे, आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे, लोक आम्हाला म्हणाले गद्दारी केली, आम्ही काही गद्दारी केली नाही. आमचा स्वतंत्र पक्ष आहे असे म्हणत तुम अगर मुख्यमंत्री बनना चाहते तो हमे भी बनना है….आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी केलं.

गेल्या अनेक दिवसांपासून मंत्रीपद नसल्याने बच्चू कडू यांची अस्वस्थता अनेकदा दिसून आली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर जाहीरपणे टिका केली आहे. यानंतर आता थेट त्यांनीच मुख्यमंत्रीपदाची आकांक्षा व्यक्त केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Protected Content