मायलेकींना मारहाण करत विनयभंग; तिघांवर गुन्हा दाखल

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथे राहणाऱ्या ३१ वर्षीय महिलेसह तिच्या मुलीला मारहाण करत विनयभंग केल्याचा प्रकार मंगळवार १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. याप्रकरणी बुधवार २० मार्च रोजी रात्री १०.३० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील नंदगाव येथे ३१ वर्षीय महिला ही आपल्या मुली व कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १९ मार्च रोजी सकाळी ९ वाजता महिला ही आपल्या मुलीसोबत असतांना गावात राहणारे कैलास शांताराम पाटील, उमेश कैलास पाटील आणि रजूबाई कैलास पाटील या तिघांना कारण नसतांना मायलेकीला मारहाण केली व दोघांना लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. आणि दोघांना जिवेठार मारण्याची धमकी देखील दिली. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार बुधवारी २० मार्च रोजी रात्री साडेअकरा वाजता मारहाण करणारे कैलास शांताराम पाटील, उमेश कैलास पाटील आणि रजूबाई कैलास पाटील तिघे रा. नंदगाव ता. अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सुनिल पाटील हे करीत आहे.

Protected Content