चाळीसगावात भाजपचा मेळावा उत्साहात

bjp meeting chalisgaon

चाळीसगाव प्रतिनिधी । नवजीवन सिंधी सेवा मंडळाच्या बजाज स्मृती हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. यात खासदार उन्मेष पाटील यांनी उपस्थित पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन केले.

येथील नवजीवन सिंधी सेवा मंडळाच्या बजाज स्मृती हॉलमध्ये भाजप तालुका शहर बूथ प्रमुख, पेज प्रमुख, मंडल अध्यक्ष, शक्ती केंद्र यांच्यासह कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून खासदार उन्मेष पाटील यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती पोपट भोळे, जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, महिला आयोगाच्या माजी सदस्या देवयानी ठाकरे, पंचायत समितीच्या सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, जि.प. सदस्या मंगलाताई जाधव, तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेश्‍वर पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब जाधव, पंचायत समितीचे सदस्य सुनील पाटील, सुभाष पाटील, पालिकेतील गटनेते संजय पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रभाकर सोनवणे, सुरेश महाराज हिंगोणेकर, अ‍ॅड. प्रशांत पालवे, अमोल नानकर, धनजय मांडोळे , प्रा. सुनील निकम, अनिल नागरे, कपिल पाटील, तालुकाध्यक्ष रोहन सुर्यवंशी , शहराध्यक्ष अक्षय मराठे. उमंग महिला मंडळाच्या अध्यक्षा संपदा पाटील, माजी अध्यक्ष लालचंद बजाज ,यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ संजीव पाटील यांनी ग्रामीण नोंदणी प्रमुख पदी माजी पंचायत समितीचे सदस्य दिनेश बोरसे, सह प्रमुख डॉ. महेंद्र बोरसे, शहर नोंदणी प्रमुख अड.प्रशांत पालवे, सह प्रमुख प्रा. सचिन दायमा यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांचा सत्कार करण्यात आला.

खासदार उन्मेष पाटील म्हणाले की, जनतेला दिसतोय फरक म्हणून शिवशाही येणार परत तसेच सुरक्षित महाराष्ट्र स्वाभिमानी महाराष्ट्र ही घोषणा पक्षाने दिली आहे. पक्षाचा विस्तार कार्यकर्त्यांच्या जीवावर आहे हे विसरून चालणार नाही.राज्य शासन व केंद्र सरकारच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्ता करतो आहे. येत्या काळात जोमाने सर्वसामान्य माणसाला तसेच युवा नव मतदारांना आणि महिलांना सहभागी करून घ्यावे. आजपर्यंत शासनाच्या अनेक योजना राबविण्यात आल्याा त्यांच्या प्रचार व प्रसारासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली पाहिजे. चाळीसगाव शहर व तालुक्याचे भारतीय जनता पक्षाचे संघटन जिल्ह्यात क्रमांक एक वर आहे हे संघटन अधिकाधिक मजबूत करण्यासाठी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुन्हा नव्या जोमाने मेहनत घ्यावी. सर्व घटकांना योग्य न्याय देणारे सरकार राज्यात पुन्हा यावे आणि पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थापन करण्यासाठी विधानसभेच्या निवडणुका अगोदर आपण पक्ष मजबूत करण्यासाठी नक्कीच परिश्रम घ्यावेत. असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी व्यक्त केले.

प्रास्ताविक के. बी. साळुंखे यांनी केले. सूत्र संचालन प्रा सुनील निकम तर आभार अमोल नानकर यांनी मानले.

Protected Content