विजेच्या धक्क्याने विवाहितेचा जागीच मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील गंगापूरी येथील विवाहितेचा विद्यूत वजन काट्याचा शॉक लागलेल्या दुदैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी २७ ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. कानुमातेच्या उत्सवासाठी घरी आलेल्या परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. भारती घनश्याम पाटील (वय-३०, रा. गंगापूरी ता. धरणगाव) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील गंगापूर येथील घनश्याम रायभान पाटील हे पत्नी भारती पाटील आणी दोन मुलांसह सुरत येथे वास्तव्याला आहे. कानुबाईचा उत्सव असल्याने घनश्याम पाटील हे पत्नी व दोन्ही मुलांसह गावाती गंगापूर येथे आलेले होते. रविवारी २७ ऑगस्ट रोजी घनशाम पाटील हे आईवडीलांसह सकाळी शेतात भेंडी तोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी विवाहिता भारती व दोन्ही मुलं घरीच होते. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास भारतीबाईची दोन्ही मुलं रडत आरडाओरड करायला सुरूवात केली. शेजारी राहणाऱ्यांना आमची आई बेशुध्द पडली असल्याचे सांगितले. शेजारी राहणाऱ्या महिला व ग्रामस्थांनी धाव घेतली असता त्यांचा हातात वजनकाट्याची ईलेक्ट्रीक पीन हातात दिसली. त्यामुळे त्यांचा ईलक्ट्रीक शॉकचा धक्का लागल्याने त्या बेशुध्दावस्थेत आढळून आल्या.  गावकऱ्यांनी मिळून भारती पाटील यांना धरणगाव ग्रामिण रुग्णालय येथे उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंत मयत घोषीत केले.  या प्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली अली. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर शिंदे हे करीत आहेत.

 

Protected Content