मालवाहू गाडी उलटल्याने तिघे गंभीर जखमी

Road Accident

जळगाव प्रतिनिधी । साळवा येथून औरंगाबादकडे धान्याची गाडीतून जात असतांना एरंडोल जवळ गाडी कलंडल्याने तिघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास घडली असून तिघांना जळगावातील खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की, अरूण सोमा अत्तरदे (वय-55), युवराज बाबुराव पारधी (वय-58) आणि कैलास जगन्नाथ बहाडे (वय-40) तिघे रा.साळवा ता. धरणगाव हे मालवाहू छोटा हत्ती गाडीत धान्य घेवून एरंडोल मार्गे औरंगाबादकडे जात असतांना सकाळी 9 ते 10 वाजेच्या सुमारास एरंडोल पासून अगदी हाकेच्या अंतरावर ओव्हरलोड झाल्याने मालवाहु गाडी कलंडली. गाडी कलंडल्याने तिघेजण पोत्यांच्या खाली दबले गेल्याने गंभीर दुखावत व जखमी झाले. तिघांना प्राथमोपचारासाठी जिल्हा सामन्य रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने नातेवाईकांनी त्यांना खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. याबाबत अद्यात पोलीसात कुठलीही नोंद नाही.

Add Comment

Protected Content