राज्यात ५ ऑगस्टपासून मॉल्स व व्यापारी संकुले खुली होणार

मुंबई प्रतिनिधी । केंद्र सरकारने अनलॉक ३.० जाहीर केल्यानंतर ठाकरे सरकारने राज्यातील लॉकडाऊन ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याची घोषणा केली आहे. तथापि, ५ ऑगस्टपासून मॉल्स आणि व्यापारी संकुले खुली करण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे.

केंद्र सरकारकडून आज अनलॉक ३.० जाहीर करण्यात आले. यात कंटेनमेंट झोनमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर महाराष्ट्र सरकारनेही ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्याची घोषणा केली आहे. यासोबत मिशन बिगीन अगेन अंतर्गत निर्बंध शिथील करण्यासंबंधीही सूचना करण्यात आल्या आहेत. नियमांचं कठोरपणे पालन करण्याची सूचना यावेळी करण्यात आली आहे.

नव्या आदेशात राज्यातील मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स ५ ऑगस्टपासून सकाळी ९ ते संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्समधील थिएटर, फूड कोर्ट आणि रेस्तराँ सुरु ठेवण्यास मात्र परवानगी नाही. पण होम डिलिव्हरी करता येणार आहे.

यासोबत दुचाकीवर दोघांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. टॅक्सी, कॅबमध्ये १ अधिक ३, रिक्षामध्ये १ अधिक २, चारचाकीमध्ये १ अधिक ३ आणि दुचाकीवर दोघांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र यावेळी मास्क अनिवार्य असणार आहे.अत्याव श्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधीही परवानगी होती ते सुरु राहतील तसंच अनावश्यक सेवेची दुकानं ज्यांना याआधी सुरु ठेवण्याची परवानगी आहे ते सुरु राहतील. अत्यावश्यक तसंच अनावश्यक मार्केट, मार्केट परिसर आणि दुकानांना सकाळी ९ चे संध्याकाळी ७ पर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी आहे. मद्य दुकानांना परवानगी असेल तर सुरु ठेऊ शकतात. अत्यावश्यक तसंच अनावश्यक गोष्टींसाठी ई-कॉमर्सला परवानगी असून सध्या सुरु असलेल्या सर्व उद्योगांना काम सुरु ठेवण्याची परवानगी आहे.

दरम्यान, संघाची आवश्यकता नसणारे खेळ उदा. गोल्फ, फायरिंग रेंज (आऊटडोअर), व्यायामशाळा (आऊटडोअर), टेनिस, बॅडमिंटन (आऊटडोअर) आणि मल्लखंब यांना ५ ऑगस्टपासून परवानगी देण्यात आली आहे. यावेळी फिजिकल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायजेशन अनिवार्य असणार आहे. स्विमिंग पूल मात्र बंदच राहणार आहेत.

Protected Content