महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार लोकसभेच्या निवडणूका

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाने लोकसभा २०२४ निवडणूकीच्या तारखा आज शनिवारी दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद घेऊन जाहीर केल्या. या निवडणुकांसाठी आचारसंहिता ही लागू करण्यात आली आहे. यावेळी १०.५ लाख पोलिंग बूथ असून ९७ कोटींपेक्षा जास्त मतदार आहे. ५४ लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम मशिन्सद्वारे लोकसभा निवडणुका संपन्न होणार असून दीड कोटी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ही माहिती निवडणूक आयूक्त राजीव कुमार यांनी दिली. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक घेण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघात शुक्रवार, १९ एप्रिल रोजी मतदान होईल, दुसऱ्या टप्प्यात बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या मतदारसंघात शुक्रवार, २६ एप्रिल रोजी मतदान होईल, तिसऱ्या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात मंगळवार, ७ मे रोजी मतदान होईल, चौथा टप्प्यात नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या मतदारसंघात सोमवार, १३ मे रोजी मतदान होईल, पाचव्या टप्प्यात धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघात सोमवार, २० मे – रोजी मतदान होईल. ‍त्यानंतर ४ जूनला लोकसभा निवडणूकीचा निकाल जाहीर केला जाईल.

Protected Content