महाविकास आघाडीचे नेते १ सप्टेबर रोजी राज्यपालांना भेटणार

मुंबई प्रतिनिधी | आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसह राज्यपालांना भेटण्यावरून संभ्रम निर्माण झाला असतांनाच आता महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्यपालांनी १ सप्टेबरची वेळ दिल्याची माहिती शिवसेनेचे सचिव मिलींद नार्वेकर यांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून राजभवनाकडे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीची वेळ मागण्यात आली होती. पण राजभवनाकडून वेळ देण्यात आली नाही, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे संध्याकाळच्या सुमारास शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर राजभवनावर दाखल झाले होते. त्यांनी राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली. त्यानंतर राजभवनाकडून 1 सप्टेंबरला भेटीसाठी वेळ दिली आहे. 

त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता 1 सप्टेंबरला राज्यपालांच्या भेटीसाठी जाणार आहेत. त्यावेळी 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

 

Protected Content