मुंबई प्रतिनिधी । बॉलीवुड अभिनेत्री कंगना राणावतने आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. कंगनाचा हा चित्रपट अयोध्येतील राम मंदिरावर आधारित आहे. ‘अपराजित अयोध्या’ असे या चित्रपटाचे नाव असून कंगना स्वत: या चित्रपटाची निमिर्ती करणार आहे. राम मंदिर हा विषय देशातील संवेदनशील समजला जातो. नुकताच राम मंदिराच्या बाजूने सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे.
या चित्रपटाची निर्मिती कंगनाच्या निर्मिती संस्थेकडून केली जाणार आहे. तिच्या कंपनीकडून निर्मिती होत असलेला ‘अपराजित अयोध्या’ हा पहिलाच सिनेमा असणार आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि खटला या विषयावर सिनेमाची निर्मिती केली जाणार आहे. पुढच्या वर्षी या सिनेमाच्या शुटिंगला सुरुवात होणार असून बाहुबली सीरीजचे निर्माते के.वी विजयेंद्र प्रसाद या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. अयोध्येतील राम जन्मभूमी आणि बाबरी मशीदीचा हा वाद अनेक दशके जुना आहे. ८०च्या दशकातील पिढीला अयोध्या प्रकरणाची केवळ नकारात्मक बाजू माहीत होती. या प्रकरणामुळे भारतीय राजकराणाला एक वेगळं वळण मिळाले. राजकारणाचा चेहरा बदलला. सर्वोच्च न्यायालयानं नुकताच जो निकाल दिला त्यामुळं अनेक वर्षे सुरू असलेला वाद सध्या तरी मिटला आहे. हा मुद्दा एका प्रकारे माझ्या खासगी आयुष्यातील प्रवासही दाखवतो. माझ्या कंपनीकडून निर्मिती होत असलेल्या पहिल्या सिनेमासाठी यापेक्षा चांगला विषय असू शकत नाही, त्यामुळं या सिनेमाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला, असे कंगनाने म्हटले आहे.