शिवापूर येथे कबड्डी स्पर्धेला प्रारंभ

WhatsApp Image 2019 08 20 at 8.14.55 PM

चाळीसगाव, प्रतिनिधी | खेळाच्या माध्यमातून तरुणांच्या मनगटाची व मनाची मेहनत होते. मैदानी खेळ हे सांघिक भावना निर्माण करण्यासाठी खूप महत्वाचे ठरतात. तरुणांनी अधिकाधिक मैदनी खेळाकडे वळायला हवे असे आवाहन मंगेश चव्हाण यांनी केले.

ते शिवापूर येथे जगदंबा कबड्डी क्लब यांच्या माध्यमातून आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी बोलत होते. तरुणांनी मैदानी खेळाकडे वळावे यासठी निरंतर प्रयत्न करत आहे.पिंपरखेड, लोंढे, बोढरे या ठिकाणी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने प्रोत्साहन दिल्याचे श्री. चव्हाण यांनी पुढे म्हटले आहे. शिवापूर याठिकाणी कबड्डी स्पर्धेला ही अश्याच पद्धतीने प्रोत्साहन दिले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन नंदू घाडगे, विजय कदम , वाल्मीक राजपूत, सचिन पवार, पोपट राजपूत, समाधान मोरे, अंकुश राठोड यांनी केले. तर कार्यक्रमाला प्रभाकर चौधरी, भास्कर पाटील, योगेश खंडेलवाल हे उपस्थित होते.

Protected Content