शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आक्रोश मोर्चासाठी सहभागी व्हा- अतुल पाटील

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटाच्यावतीने ३० नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या आक्रोश मोर्चात रावेर तालुक्यातील शेतकऱ्यांनीसहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोकसभा क्षेत्र प्रमुख अतुल पाटील यांनी केले आहे. रावेर येथील बाजार समिती सभागृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी बैठकीला माजी आमदार अरुण पाटील, लोकसभाक्षेत्र संपर्क प्रमुख तालुकाध्यक्ष किशोर पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष महेमुद शेख, बाजार समितीचे संचालक पांडुरंग पाटील, गणेश महाजन, मंदार पाटील, ओबिसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, माजी जि.प. सदस्य मुरलीधर तायडे, पंचायत समिती माजी सदस्या योगिता वानखेडे, दिलीप पाटील, लक्ष्मण मोपारी, प्रल्हाद बोंडे, सोपान पाटील, इरफान पहेलवान, अनिल आसेकर, प्रविण पाटील, सलीम सयबुद्दीन यांच्यासह राष्ट्रवादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content