पाचोरा (प्रतिनिधी) येथील आम आदमी पक्षाचे नेते जितेंद्र जैन यांनी आज पक्ष सोडत असल्याचे जाहीर केले आहे. ते आम आदमी पक्षात स्थापनेपासून सक्रिय होते. तालुका अध्यक्ष, जळगाव निरीक्षक, उत्तर महाराष्ट्र खजिनदार, लोकसभा निवड समिती सदस्य अशी विविध पदे त्यांनी उत्तमरित्या भूषवलेली होती.
आम आदमी पक्षात संघटनात्मक धोरणाचा अभाव, दिल्लीकडून महाराष्ट्राला नेहमीच दिली जाणारी दुर्लक्षित वागणूक, निस्वार्थ, समर्पित कार्यकर्ते असूनही कार्यकर्त्यांशी संवादाचा अभाव. निवडणुका न लढल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण व जनतेमध्ये अविश्वासाचे वातावरण असणे. पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत राज्याच्या नेत्यांमध्ये असलेली अनिश्चितता, या सर्व बाबींमुळे आज पक्ष सोडल्याची घोषणा त्यांनी केली आहे. अभ्यासू, शिस्तबद्ध कार्यप्रणाली असलेले व्यक्तिमत्व, जिल्ह्यात त्यांना ओळखणारा व मानणारा मोठा वर्ग आहे.आता पुढे त्यांची राजकीय भूमिका काय असेल याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.