सरकारला वेड लागलयं- जितेंद्र आव्हाड ( व्हिडीओ )

मुंबई प्रतिनिधी । पूरग्रस्तांची मदत करण्याऐवजी प्रशासन थट्टा करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारला वेड लागल्याची घणाघाती टीका केली आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापूराने हाहाकार होत असतांना राज्य सरकार असंवेदनशीलपणा दाखवत असल्याची टीका सर्वत्र करण्यात येत आहे. यात आता राष्ट्रवादीच आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी सोशल मीडियात एक व्हिडीओ जारी करून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या व्हिडीओत आव्हाड यांनी म्हटले आहे की, भाकरी मिळत नसेल तर पाव खा म्हणणार्‍या राणीशीच या सरकारची तुलना केली पाहिजे. दोन दिवस पुराच्या पाण्यात असाल तरच मदत दिली जाईल. हा कसला आदेश आहे? असा आदेश काढताना लाज वाटत नाही का? राज्यावर संकट आलं तेव्हा शिवाजी महाराजांनी खजिना रिता केला होता. तशी दानत या सरकारने का दाखवली नाही असाही प्रश्‍न त्यांनी विचारला आहे. त्या पूरग्रस्तांना मदत मिळण्यासाठी जाचक अटी असणारा अध्यादेश काढण्यात असून यावरूनही त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

पहा : जितेंद्र आव्हाड यांचे सरकारवर टीका करणारे ट्विट

Protected Content