विजेच्या धक्क्याने दोन वायरमनचा मृत्यू

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ऐन दिवाळीच्याच दिवशी फत्तेपूर येथे दोन वायरमचा वीज धक्का लागून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.

जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे पेट्रोल पंपच्या समोर असणार्‍या शेतात विजेची तार खाली पडल्याची तक्रार स्थानिक वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात करण्यात आली. यामुळे गणेश प्रकाश नेमाडे ( वय ४५, रा. कन्हाळा, ता. भुसावळ ) हे वायरमन आपले झीरो वायरमन असणारे सहकारी सुनील भरतसिंग चव्हाण ( रा. टाकळी पिंप्री, ता. जामनेर) यांना घेऊन घटनास्थळी पोहचले. या दोघांनी तारेला स्पर्श करताच त्यांना विजेचा जोरात धक्का बसला. यामुळे गणेश नेमाडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुनील चव्हाण यांना रूग्णालयात घेऊन जात असतांना त्यांची प्राणज्योत मालवली.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या दोन्ही मयतांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे. तर, ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी उपजिल्हा रूग्णालयात जाऊन मृतांच्या आप्तांचे सांत्वन केले.

Protected Content